काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिक्रिया 

मुंबई: नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा ४५ हजारांपेक्षा जास्त मतांनी झालेला विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारवर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त के ली.

भाजपने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे जयंत पाटील यांनी भाजपवर शरसंधान साधले