मुंबई : दरवर्षी देशभरातून सुमारे ८० हजारपेक्षा अधिक रुग्ण कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयामध्ये येतात. उपचारासाठी आलेल्या या रुग्णांना आर्थिक व सामाजिक अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या रुग्णांना त्यांच्या घराजवळ कर्करोगावरील उपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी टाटा रुग्णालयातर्फे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील टाटा रुग्णालय, पंजाबमधील मुल्लानपूर आणि आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज कर्करोग उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई, मुल्लानपूर आणि विशाखापट्टणम येथे ७.५ लाख चौरस फुटांच्या जागेत तीन नव्या इमारती उभारण्यात येणार आहे. या इमारती २०२७ पर्यंत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आयसीआयसीआय फाऊंडेशनकडून सामाजिक उत्तरदायित्त्व निधीपोटी जवळपास १२०० कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी आयसीआयसीआयसोबत शुक्रवारी करार करण्यात आला. आधुनिक उपकरणे आणि खास मल्टीडिसिप्लिनरी तुकडीच्या मदतीने आँकोलॉजी उपचारांची ही केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर दरवर्षी किमान २५ हजार नव्या रुग्णांवर आधुनिक पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. या नव्या इमारती प्रादेशिक पातळीवर उभारण्यात येणार असल्यामुळे रुग्णांना मुंबईत येण्याची गरज भासणार नाही. तसेच देशातील अधिकाधिक कर्करोग रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
11 thousands Nikshay Mitra adopt 19 thousands tuberculosis patients
११ हजार ‘निक्षय मित्रां’नी १९ हजार क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक, दोन वर्षांत ८८ हजार पोषण किट केले उपलब्ध