मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे सध्या मुंबईकडे येणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत असल्याचे समजत आहे. त्यामुळे कार्यालये गाठण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेले अनेक महिने मध्य रेल्वेमार्गावर बिघाड आणि अपघाताचे सत्र सातत्याने सुरू असलेले पहायला मिळत आहे. वारंवार मेगाब्लॉक आणि दुरूस्ती करूनही तांत्रिक बिघाड होताना दिसत आहेत.