मुंबई : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्राची मोठी घसरण झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील सर्वोत्तम दहा विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये महाष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा वा महाविद्यालयाचा समावेश नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर राज्य शासनाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीच्या धर्तीवर राज्यस्तरीय शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.
‘यंदा राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) मध्ये महाराष्ट्राचा टक्का घसरला आहे. यामुळे आता राज्यस्तरावरही शिक्षण संस्थांची क्रमवारी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या क्रमवारीतून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. याचसोबत सदर राज्यस्तरीय शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये चुरस लागेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल’, असे चंद्रकांत पाटील
हेही वाचा >>>बीजेपी क्या हुआ तेरा वादा, पाणीप्रश्नी धुळेकरांचा फलकाव्दारे प्रश्न
राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी २०२३ (एनआयआरएफ) ही सर्वसाधारण, विद्यापीठे, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, महाविद्यालय, औषधशास्त्र, वैद्यकीय, वास्तुशास्त्र आणि नियोजन, विधी, दंतशास्त्र, संशोधन संस्था, कृषी आणि संलग्न क्षेत्रे या श्रेणींमध्ये जाहीर करण्यात येते. एनआयआरएफच्या सर्वसाधारण क्रमवारीत भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ‘आयआयटी मद्रास’ने गतवर्षीप्रमाणे यंदाही प्रथम स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानी आयआयएससी बंगळुरू आहे, तर आयआयटी मुंबईला मागे टाकत तिसऱ्या स्थानी ‘आयआयटी दिल्ली’ ने बाजी मारली आहे. यंदा ‘आयआयटी मुंबई&
हेही वाचा >>>शरद पवारांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
तसेच या श्रेणीत सावित्रीबाई फुले पुणे
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.