मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ आणि वढू येथील विकास आराखडय़ास नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. या विकास आराखडय़ाच्या नावामध्ये अंशत: बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केले. यानुसार या विकास आराखडय़ाच्या नावात अंशत: बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ, मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधिस्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि. पुणे विकास आराखडा’ असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.