लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना दिल्लीत भेटणार आहेत. ही भेट सोमवारी होण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे याची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटणार आहेत. यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.