मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर रात्री भीषण अपघात झाला आहे. चार गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळून झालेल्या या अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की, पाचही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एका कारचा अपघात झाला होता. यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या तीन गाड्यांनी अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेलाही धडक दिली. यानंतर सी-लिंकवर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Bee attack on wrestling ground near Patan karad
पाटणजवळ कुस्ती मैदानावर मधमाशांचा हल्लाबोल; पहिलवानांसह १५ जण जखमी
Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

अपघातात जखमी झालेल्या चार ते पाच लोकांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु असून, त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे.

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.