मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर रात्री भीषण अपघात झाला आहे. चार गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळून झालेल्या या अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की, पाचही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसा झाला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर एका कारचा अपघात झाला होता. यावेळी जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहोचली होती. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या तीन गाड्यांनी अपघातग्रस्त वाहनासह रुग्णवाहिकेलाही धडक दिली. यानंतर सी-लिंकवर एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघातात जखमी झालेल्या चार ते पाच लोकांची स्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु असून, त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे.

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collision between four cars and an ambulance on bandra worli sea link in mumbai sgy
First published on: 05-10-2022 at 08:11 IST