मुंबई : प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात असलेला पक्ष ही राज्यात काँग्रेसची ताकद असल्याने काँग्रेस हाच भाजपला प्रमुख पर्याय असून भाजपविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढत असल्याने त्यादृष्टीने पक्ष बळकट करत आहोत. काँग्रेसला राज्यात मजबूत करण्यासाठी व पक्षाचा विस्तार करण्यासाठीच केंद्रीय नेतृत्वाने मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ते काम सुरू राहील, त्याचा महाविकास आघाडी सरकारवर काहीही परिणाम होण्याचा संबंधच नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

काँग्रेसच्या पक्ष संघटना विस्ताराबाबतच्या आक्रमक भूमिकेमुळे व स्वबळाच्या भाषेमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी असल्याच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी त्याबाबत विस्ताराने भूमिका स्पष्ट केली.