राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे, परंतु निधी वाटपात काँग्रेसवर अन्याय होत असल्याची भावना त्या पक्षाचे मंत्री, आमदारांमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे विभाग व आमदारांना निधीचे समान वाटप झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री व वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या मंत्र्यांकडील विभागांना पुरेसा निधी मिळत नाही, तसेच आमदारांच्या विकास कामांच्या निधी वाटपातही असमानता असते, त्याबद्दल पक्षात  नाराजी आहे. या संदर्भात गुरुवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महिला व बालकल्याण मंत्री अड. यशोमती ठाकूर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे विभाग तसेच आमदारांना समान निधीचे वाटप करण्यात यावे, अशी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress demands equal distribution of funds to the cm uddhav thackeray abn
First published on: 18-02-2022 at 01:41 IST