मुंबई : वाढत्या महागाईचा प्रशद्ब्रा हाती घेऊन केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राज्यात नोव्हेंबरमध्ये जेलभरोसारखे तीव्र आंदोलन करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी के ली.

दादर येथील टिळक भवनात प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने अर्थव्यवस्था रसातळाला नेऊन ठेवली आहे. मंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत.

महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना दिवाळीसुद्धा साजरी करणे मुश्कील झाले आहे.

काँग्रेसने या महागाईविरोधात वारंवार आंदोलने केली, पण मोदी सरकारला जाग आलेली नाही. आता पुन्हा एकदा झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी १४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.