मुंबई : राज्यातील करोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत होती, परंतु शनिवारी मात्र रुग्णसंख्येत वाढ झाली. राज्यात दिवसभरात ९९९ नवे रुग्ण आढळले, तर ४९ जणांचा मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात १०२० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या १२ हजार २१९ इतकी आहे. गेल्या २४ तासांत मुंबई २४६, अहमदनगर ११०, पुणे जिल्हा ११६, पुणे शहर ९२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली.

मुंबईत २४७ नवे रुग्ण, २ रुग्णांचा मृत्यू

 शनिवारी मुंबईत करोनाच्या २४७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दोन करोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर ३३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत राज्यात सात लाख ३७ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असा आहे.