मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन दिवसांत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या आठवडाअखेरीस मुंबई, ठाण्यासह कोकणात पाऊस कोसळणार आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे वादळ गुजरातच्या दिशेने सारकण्याचा अंदाज काही खासगी संस्थांनी वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे  तापमान २७ अंश सेल्सिअस असावे लागते. सध्या अरबी समुद्राचे तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

मोसमी वाऱ्यांचा संथ प्रवास..

दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, अंदमान आणि निकोबार बेटापर्यंत पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांची वाटचाल संथ सुरू आहे. मोसमी वारे पुढे सरकण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे दोन दिवस आहे तीच स्थिती राहण्याची शक्यता  आहे. 

हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी वेगवेगळी ‘मॉडेल्स’ वापरल्यामुळे वादळाची तारीख आणि क्षेत्र याबद्दल वेगवेगळी माहिती मिळते. त्यामुळे वादळ नेमके कोणत्या तारखेला येणार याविषयी निश्चित काही सांगता येणार नाही. – सुषमा नायर, हवामान विभाग