मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात ३० दिवसांत अर्ज करणे आवश्यक असताना तशी काळजी घेतली जात नसल्यामुळे जप्तीची प्रक्रिया रखडून ठेवीदारांना फटका बसतो. याबाबत न्यायालयाने चपराक दिल्यानंतर राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढून कालमर्यादा कसोशीने पाळण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सक्षम प्राधिकाऱ्यांनी या संदर्भात न्यायालयीन सुनावणीच्या वेळी न चुकता हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे ठेवीदारांची बुडालेली गुंतवणूक परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> ‘सन्मानाने मृत्यू’साठी मार्गदर्शक तत्त्वे; अंमलबजावणीसाठी समिती

term of Nagpur Zilla Parishad will end on 17th january and administrative rule will be imposed from Friday
जिल्हा परिषद ते महापालिका : प्रशासकीय राजवटीचे वर्तुळ पूर्ण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Varsha Gaikwad On Saif Ali Khan
Varsha Gaikwad : ‘मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, राज्यात जे घडतंय ते…’, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर वर्षा गायकवाड संतापल्या
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Enforcement Directorate ED files Enforcement Case Information Report ECIR in Torres scam case Mumbai print news
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
mumbai police chief vivek phansalkar news in marathi
मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश

ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी राज्याने महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ हा कायदा केला आहे. या कायद्यानुसार ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. याअंतर्गत आरोपीची मालमत्ता जप्त करणे व त्याचा लिलाव करून ठेवीदारांना बुडालेली गुंतवणूक परत मिळण्याची शक्यता असते. मात्र शासनाकडून जप्ती आदेश जारी केल्यानंतरही सक्षम प्राधिकाऱ्यांकडून विहित मुदतीत अर्ज केला जात नाही. या काळात ही मालमत्ता विकली गेल्यास ती जप्त करणे अशक्य होते वा न्यायालयीन मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्याला विलंब लागत असल्यामुळे ठेवीदारांनाही बुडालेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळण्यात अडचण निर्माण होते.

आदेश काय?

●सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती निकालात काढावीत

●विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांनी जातीने हजर राहावे

●जप्त मालमत्तांच्या विक्रीनंतर ठेवीदारांना देय रकमा वितरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा

●सक्षम प्राधिकाऱ्यांकडून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा

Story img Loader