मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमध्ये ६० मीटर म्हणजेच २०० फूट इतके अंतर पुरेसे असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेने दिला आहे. मच्छीमारांच्या बोटी सुरक्षित पद्धतीने बाहेर काढता याव्यात याकरिता दोन खांबांमधील अंतर १८० किंवा २०० मीटर असावे अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात आली होती. मात्र समुद्री विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालामुळे ही मागणी आता फेटाळण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या मार्गातर्गत ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. त्याकरिता वरळीच्या समुद्रात खांब उभारावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन खांबांमधील अंतराचा मुद्दा चिघळला आहे. पालिकेच्या आराखडय़ानुसार दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर ठेवण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distance of 60 meters sufficient between the two pillars for coastal road project zws
First published on: 19-05-2022 at 02:07 IST