लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) मुंबई, दिल्ली आणि गुरगावमधील १९ ठिकाणी छापे टाकले, अशी माहिती गुरुवारी दिली. सुमाया-डेंट्सू प्रकरणातील ही कारवाई करण्यात आली असून त्यात ४६ लाख भारतीय चलन, चार लाख विदेशी चलन व तीन कोटी ४० लाख रुपयांचे सोन्याचे लगड जप्त करण्यात आले. मालमत्तांची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे हेही जप्त करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
Enforcement Directorate ED files Enforcement Case Information Report ECIR in Torres scam case Mumbai print news
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
navi mumbai firing
नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अटक
Mumbai targeted by cyber thugs after gang war terrorist attacks print exp
गँगवॉर, दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई सायबरठगांचे टार्गेट… गतवर्षी १२०० कोटींची सायबर फसवणूक! केवळ १० टक्के रिकव्हरी! 

वरळी पोलीस ठाण्यात मे. डेंट्सू कम्युनिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मे. सुमाया इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्याचे प्रवर्तक यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहेत. त्यांच्यावर १३७ कोटी रुपयांचा फसवणुकीचा आरोप आहे.

आणखी वाचा-गृह फसणुकीप्रकरणी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा

मंगळवारी हे छापे टाकण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. शोधमोहिमेत कागदोपत्री पाच हजार कोटींचे व्यवहार दाखवण्यात आले. त्यातील १० टक्के व्यवहारच खरे आहेत. पत वाढवण्यासाठी हे व्यवहार दाखवण्यात आले. त्यामुळे समभागांच्या किमतीत वाढ झाली, असे ईडीकडून सांगण्यात आले. त्यामुळे सुमाया कंपनीची उलाढाल २१० कोटीवरून दोन वर्षांतच ६७०० कोटी रुपयांवर पोहचली. त्यामुळे समभागाची किंमत १९ रुपयांवरून ७३६ वर पोहोचले होते. आर्थिक वर्ष २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीत हा प्रकार घडला होता, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.

Story img Loader