मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीची फौजदारी तक्रार अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडून अन्य महानगरदंडाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची अभिनेत्री कंगना राणावतची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.

ही तक्रार ऐकणाऱ्या अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांवर आपला विश्वास नसल्याचा आरोप करत कंगनाने हे प्रकरण अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. एवढेच नव्हे, तर अख्तर हे खंडणीखोर असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर केलेली स्वत:ची तक्रारही कंगनाने वर्ग करण्याची मागणी केली होती.