मुंबई:  केंद्र सरकारने जागतिक व्यापार आणि व्यवसायासाठी मोठय़ा संधी निर्माण करून भारताला जागतिक पातळीवर संधिकेंद्र बनवले आहे. त्यामुळे व्यापार आणि गुंतवणुकीसाठी देशात वित्तव्यवस्था बळकट करून विकासाचे पोषक वातावरण तयार करण्यावर सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मुंबईत ‘जी-२०’ व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीत कराड सहभागी झाले होते. भारताचा जागतिक निर्यातीतील १९९० मधील वाटा केवळ अर्धा टक्का होता. तो २०१८ मध्ये १.० टक्के, तर २०२२ मध्ये २.१ टक्का इतका झाला. एप्रिल-डिसेंबर २०२२ या कालावधीत  भारताची एकूण निर्यात ५६८ अब्ज डॉलर्स इतकी राहिल्याचा अंदाज आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Favorable environment for investment bhagwat karad statement g 20 summit ysh
First published on: 30-03-2023 at 01:03 IST