दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील १४ मजली ‘गणेश कृपा’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीमुळे दुर्घटनाग्रस्त इमारत आणि आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी इमारतीत अडकलेल्या २७ रहिवाशांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून सुखरूप गच्चीवर नेले. परिणामी, या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा >>> विक्रोळीत मिरवणुकीत सहभागी तरूणांनी केला महिला पोलिसांचा विनयभंग

Pimpri , Disaster Management, Japanese Technology ,
पिंपरी : आपत्तीचे संकट रोखण्यासाठी जपानी तंत्रज्ञान
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Navi Mumbai, Fire broke out, scrap godown,
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग 
thane fire breaks out in laundry shop
ठाण्यात मदत यंत्रणेच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना, इमारतमधील लॉन्ड्री दुकानात आग लागल्याने सर्वत्र पसरला होता धूर
mumbai fire brigade
मुंबई : अग्निशमन दलाच्या ताफ्यात ६८ मीटर उंच शिडी वाहने दाखल होणार
MahaRERA action against 905 housing projects Mumbai news
१,९०५ गृहप्रकल्पांवर ‘महारेरा’ची कारवाई; नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांची बॅँक खाती गोठवली
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
Crime against developer who stalled Zhopu scheme Mumbai news
झोपु योजना रखडवणाऱ्या विकासकाविरुद्ध गुन्हा; प्रलंबित योजनांचा आढावा घेऊन कठोर कारवाई करणार

गिरगावमधील सिक्का नगर परिसरातील डॉ. देशमुख लेनमधील चौदा मजली ‘गणेश कृपा’ इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये लागलेली आग क्षणातच पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टपर्यंत पसरली. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच रहिवासी दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर पडले. मात्र दुर्घटनाग्रस्त इमारतीत  १७ महिला, ५ पुरुष आणि ५ लहान मुले असे एकूण २७ रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून या रहिवाशांना सुखरुपपणे इमारतीच्या गच्चीवर नेले. आग इमारतीत पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्युतपुरवठा खंडित केला. त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Story img Loader