मुंबईच्या चेंबूर भागातील एका अनाथ आश्रमातून १७ ते २० डिसेंबर दरम्यान १३ ते १७ वयोगटातील पाच मुले बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या मुलांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – मुंबई पालिकेकडे लसींचा तुटवडा? कोविशिल्ड, कोर्बावॅक्सचे डोस संपले; कोवॅक्सिनच्या फक्त ६००० मात्रा शिल्लक!

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चेंबूरच्या एका अनाथाश्रातून १७ डिसेंबर रोजी १३ आणि १४ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. तसेच १८ डिसेंबर रोजी आणखी १५ आणि १७ वर्षांचा, तर २० डिसेंबर रोजी १४ वर्षांचा एक मुलगा बेपत्ता झाला. मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडल्यानंतर हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित अनाथ आश्रम जिल्हा महिला बाल विभागांतर्गत चालवण्यात येत असून येथे १२ ते १८ वयोगटातील अनाथ मुलांचे संगोपन करण्यात येते.

हेही वाचा – करोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

दरम्यान, पोलिसांकडून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येत असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असल्याची माहिती चेंबूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचेही ते म्हणाले.