दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास मुंबईतील बंदरात असा एक अपघात झाला, ज्यामुळं अख्खी मुंबई हादरली होती. स्फोटक पदार्थ, तेल, कापूस, सोनं आदी माल असलेल्या एका जहाजामध्ये झालेल्या स्फोटाचे आवाज पार पालघर, खोपोली, मुरूड जंजिऱ्यापर्यंत ऐकायला गेले होते. या स्फोटामुळे जहाजातील सोन्याच्या विटांचा मुंबईवर पाऊसच पडला होता. मुंबईला समूळ हादरवणाऱ्या या स्फोटाचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर. ‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.