Premium

राज्यपालांची भूमिका बदलली! ; विधानसभा अध्यक्षपद निवडणूक नियमातील बदलांना पूर्वी विरोध आता मात्र सहमती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताबदल होताच नव्या नियमानुसार अध्यक्षांची निवडणूक घेण्यास मान्यता दिली आहे

Bhagat-Singh-Koshyari-2
(संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात करण्यात आलेल्या बदलांना आक्षेप घेत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने गेल्या मार्चमध्ये निवडणुकीची तारीख निश्चित करण्यास नकार देणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताबदल होताच नव्या नियमानुसार अध्यक्षांची निवडणूक घेण्यास मान्यता दिली आहे. याबरोबरच विधान परिषदेतील १२ नामनियुक्त सदस्यांची नियुक्ती झाल्याशिवाय भाजपला सभापती पद मिळणार नसल्याने गेली दीड वर्षे यावर काहीच निर्णय घेण्याचे टाळणाऱ्या राज्यपालांची सत्ताबदलानंतर भूमिका काय असेल, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा अध्यक्षपदासाठी जुन्या नियमात महाविकास आघाडी सरकारने बदल केला होता. त्यानुसार गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने ही निवडणूक घेण्याचा नियमात बदल करण्यात आला. विधानसभेने या बदलाला बहुमताने मान्यता दिली होती. गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षांच्या निवडीसाठी तारीख निश्चित करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. तेव्हा नियमात करण्यात आलेले बदल हे कायद्याशी सुसंगत आहेत का, याची चाचपणी करावी लागेल, असे उत्तर राजभवनने दिले होते. तेव्हा राज्यपाल व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रव्यवहारात तिखट भाषेचा वापर झाला होता.  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी पुन्हा अध्यक्षांच्या निवडीसाठी तारीख निश्चित करण्याची शिफारस ठाकरे सरकारने केली असता नियमात करण्यात आलेले बदल न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत राजभवनने १५ मार्चला अध्यक्षांच्या निवडणुकीला परवानगी नाकारली होती. परिणामी निवडणूक होऊ शकली नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Governor bhagat singh koshyari stand change on maharashtra assembly speaker election zws

First published on: 03-07-2022 at 02:02 IST
Next Story
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदरच, यापुढे कोणताही विजयोत्सव नाही ; दीपक केसरकर यांचे प्रतिपादन