राज्यात जुल आणि ऑगस्टमध्ये दोन टप्प्यांत होणाऱ्या नऊ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नवी पद्धती राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार शनिवारपासून (४ जुल) उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावे लागणार आहेत. तसेच या निवडणुकांसाठी पहिल्यांदाच निरीक्षकही नियुक्त करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

९ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपासून हे बदल लागू करण्यात येत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी दिली.
ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी इच्छुक उमेदवारांना या वेळी प्रथम ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने http://panchayatelection.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून नामनिर्देशनपत्रे भरावी लागणार आहेत. त्यानंतर ऑनलाइन नामनिर्देशनपत्राची छापील प्रत (प्रिंट्रआऊट) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहीत मुदतीत सादर करावी लागेल. उमेदवारांनी भरलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करेपर्यंत अर्जात दुरुस्त्या करण्याची या प्रक्रियेमध्ये मुभा देण्यात आली आहे.

BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन
pimpri chinchwad cp vinay kumar choubey marathi news
पिंपरीत ‘चौबे पॅटर्न’, पोलीस आयुक्तांनी ३९ आरोपींवर लावला मोक्का; आतापर्यंत एकूण ३९६ आरोपींवर कारवाई
chandrapur lok sabha election 2024 marathi news
लोकसभा निवडणूक : ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले तर काय? ‘ही’ असेल उपाययोजना