मुंबई : कोकणात हरित तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारणारच, पण त्याच वेळी कोकणात प्रदूषणकारी उद्योग सुरू केले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख तरुणांना रोजगार मिळणार असून किमान पाच लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. कोकणातील मूळ रहिवाशांच्या उपजीविकेवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कोकणच्या विकासासाठी राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असेही त्यांनी सांगितले.

स्वराज्य भूमी कोकण महोत्सवात बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ज्यांना कोकणाने भरभरून दिले, त्यांचे सरकार असताना अडीच वर्षांत कोकणचा विकास ठप्प झाला. तेलशुद्धीकरण प्रकल्पाला जनतेमध्ये गैरसमज पसरवरून विरोध करण्यात आला.

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Overthrow the tyrannical government and bring your rightful government at the centre says aditya thackeray
वृद्ध शेतकऱ्याने केली ईडी अन् ५० खोक्यांवर बोलण्याची ‘फर्माईश’; आदित्य ठाकरेंनी केले असे की…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान