मुंबई : निवडणूक जवळ आल्यामुळे मुंबईतील विकासकामांना वेग आला असून पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपला जिल्हा नियोजन समितीचा काही निधी पालिकेला दिला आहे. जिल्हा नियोजन समितीने ३५ कोटी ९० लाख रुपये निधी देण्याचे हमीपत्र पालिकेच्या नियोजन विभागाला दिले आहे. या निधीतून आधुनिक बसथांबे, उद्यानांचा विकास व हिरवळीच्या जागा वाढवणे तसेच चौकांचे सुशोभीकरण अशी कामे हाती घेतली जाणार आहे. याच अंतर्गत उपनगरातील सहा महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याकरिता १९ कोटी ५१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आधीच मोठमोठय़ा विकासकामांच्या प्रकल्पांचे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करीत आहे. उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे असून त्यांनी आपला निधी मुंबईच्या विकासकामांसाठी मुंबई महापालिकेला दिला आहे. त्याअंतर्गत शहर भागात विविध कामे हाती घेतली जाणार असून ही विकासकामे मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. त्यात उपनगरातील सहा चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार असून आवश्यक तेथे रुंदीकरणासह सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे. वाहनांबरोबरच पादचाऱ्यांचाही विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १९ कोटी ५१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister s funds for development works in mumbai zws
First published on: 20-01-2022 at 01:08 IST