मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ(सीएसटी) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. सीएसटीहून वाशी-पनवेल-अंधेरीकडे जाणाऱया गाड्या यामुळे १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. तब्बल ७२ तासांच्या मेगाब्लॉकनंतरही हार्बर रेल्वेचे रडगाणे पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.