scorecardresearch

Premium

हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत?

हा प्रकल्प गोरेगावऐवजी बोरिवलीपर्यंत विस्तारल्यास प्रवाशांना त्याचा जास्त फायदा होईल

नव्या वर्षांत उपनगरीय प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अंधेरी ते विरार या दरम्यान गाडय़ांचा विस्तार करण्याबरोबरच वेग वाढवण्यावर पश्चिम रेल्वेने भर दिला आहे. त्याचबरोबर गोरेगावपर्यंत आणण्यात येणाऱ्या हार्बर मार्गाचा विस्तार बोरिवलीपर्यंत करावा, असा विचार रेल्वे अधिकाऱ्यांकडूनच समोर येत आहे.
या प्रकल्पाबरोबरच मुंबई सेंट्रल ते बोरिवली या दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे कामही वेगाने पूर्ण करण्याची गरज अधिकारीच बोलून दाखवत आहेत.
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘एमयुटीपी-२’ या योजनेअंतर्गत अंधेरी-गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प हाताळण्यात येत आहे.
हे काम अद्याप रखडले असून जोगेश्वरी येथील काही बांधकामांचा अडथळा येत असल्याचे एमआरव्हीसीतर्फे सांगितले जात आहे. मात्र, हा प्रकल्प गोरेगावऐवजी बोरिवलीपर्यंत विस्तारल्यास प्रवाशांना त्याचा जास्त फायदा होईल. बोरिवली ते पनवेल थेट सेवा सुरू करणे शक्य होणार असून बोरिवली-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या फेऱ्यांमध्येही वाढ करता येणार आहे. सध्या या मार्गावर केवळ एकच फेरी सुरू आहे.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2016 at 00:42 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×