मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी, पिंपरी-चिंचवड, मालेगावसह राज्यातील २६ ठिकाणी गोवरचा संसर्ग झाला असून, आतापर्यंत ७२४ बाधित आढळले आहेत. राज्यभरात सुमारे १२ हजार गोवर संशयित आढळून आले आहेत. गोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण करून त्यांच्यावर तिथेच उपचार करून नंतर स्थलांतरित करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली.

राज्यात आतापर्यंत गोवरमुळे १५ बालकांचा मृ्त्यू झाला आहे.  मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, वसई-विरार, पनवेल, पिंपरी-चिंचवड मालेगाव, औरंगाबाद, बुलढाणामध्ये गोवरची साथ पसरली आहे. या सर्व ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या ८७७ पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे. गोवरची लक्षणे असल्यास संबंधित बालकांची माहिती तात्काळ आरोग्य विभागास द्यावी, अशा सूचना शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. गोवर प्रतिबंधात्मक औषधे, ‘अ’ जीवनसत्वाची मात्रा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त
mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
divyang survey marathi news, maharashtra divyang survey marathi news
राज्यात तीस वर्षांनी दिव्यांग सर्वेक्षणाला मुहूर्त… होणार काय?