scorecardresearch

Premium

Mumbai Monsoon Update: दमदार पावसामुळे धरणांत भर

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे पाणीपातळीत  ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Heavy rain maharashtra
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे पाणीपातळीत  ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सात धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, यंदा पावसाचा लंपंडाव लक्षात घेता मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे.

सप्टेंबरमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यास मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागेल, असे मुंबई महानगरपालिकेच्या जलभियंता विभागाकडून सांगण्यात आले होते. गुरुवापर्यंत धरणांमधील जलसाठा काही प्रमाणात आटला होता. जुलै महिन्यात तुळशी, विहार, तानसा व मोडकसागर हे चार तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले होते. मात्र, विहार वगळता इतर तलावांची पाणीपातळी पुन्हा खालावली होती. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली. मात्र, गुरुवारी पहाटेपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

uran potholes and dust on the road, uran people suffer due to potholes, dust due to potholes in uran
उरण : पावसाळा सरला आणि रस्त्यांवर धुरळा पसरला; प्रवाशांना खड्डे आणि धुरळा यांचा करावा लागतोय सामना
navi mumbai water supply, navi mumbai municipal corporation no control on water distribution, water intake from morbe dam
नवी मुंबई : मोरबे धरणातून पाण्याचा वारेमाप उपसा अन् मनमानी वितरणामुळे पालिकेचे जल नियोजन विस्कळीत
loudspeeker sound
आवाज वाढला, कुणी नाही ऐकला!; ध्वनिप्रदूषण आकडेवारीबाबत यंत्रणांचे कानावर हात
Yelgaon dam filled up
बुलढाणा: येळगाव धरण ७५ टक्क्यांपर्यंत भरले, नागरिकांना दिलासा

हेही वाचा >>> Weather Update: राज्यात सर्वदूर पाऊस; कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी

हेही वाचा >>> वंशावळ शब्द वगळण्यास सरकार तयार? जरांगेंनी आंदोलन तीव्र केल्याने निर्णय

गुरुवारी पहाटेपर्यंत ९०.३७ टक्के असणारा पाणीसाठा शुक्रवारी पहाटे ९३.१७ टक्क्यांवर पोहोचला. तलावांमध्ये सध्या १३ लाख ४८ हजार ४४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तानसा व तुळशी पुन्हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. तर, मध्य वैतरणा भरण्याच्या मार्गावर आहे. मागील दोन दिवसांप्रमाणे पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीकपातीची शक्यता कमी होऊ शकेल. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात धरणांमधील पाणीपातळी कमी होऊ लागल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rains the water storage in the dams water supply to mumbaikars has increasing mumbai print news ysh

First published on: 10-09-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×