scorecardresearch

Premium

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांची माध्यमांना प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रभाकर साईल यांना सुरक्षा पुरवण्यात आली असल्याचंही सांगितलं आहे.

(संग्रहीत छायाचित्र)
(संग्रहीत छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आज बैठक झाली. या बैठकीत समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात होतं. ही बैठक संपल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला, तेव्हा त्यांनी या भेटीबाब माहिती दिली.

“आम्ही प्रभाकर साईल यांना संरक्षण देण्यात आलं आहे. त्यांनी केलेल्या सुरक्षेच्या मागणीवरून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. या राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणासाठी आम्ही काम करत आहोत. अजून नवाब मलिक आणि माझी भेट झालेली नाही. ते सध्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे, ते समजून घेऊन मग पुढील योग्य ती कारवाई आम्ही करू.” तर, “एफआयआर दाखल करण्यासाठी कुणीतरी तक्रार द्यावी लागते, ती तक्रार दिली तर पोलीस पुढील कारवाई करतील.” असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…

तसेच, मुख्यमंत्र्यांनी याबाबत काही माहिती घेतली आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले की, “या विषयाबाबत माझी व मुख्यमंत्र्यांची जुजबी चर्चा झाली. फार काही चर्चा झाली नाही. मी दुसऱ्या बैठकीच्या निमित्त गेलेलो होतो. त्यामळे या विषयावर फार काही चर्चा झालेली नाही.”

गृहमंत्री वळसे पाटील ‘वर्षा’ बंगल्यावर; मुख्यमंत्र्यांशी समीर वानखेडेंविषयी चर्चा?

याचबरोबर, “आजपर्यंत केंद्रीय यंत्रणांचा एवढा वापर इतक्या वर्षांमध्ये कधीही झालेला नव्हता. आता थोडासा जास्त वापर होतोय. असं देखील गृहमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.

आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान यांच्याकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील आठ कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. प्रभाकर यांनी एक चित्रफीत प्रसारित केली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडालेली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Home minister walse patils reaction to the media after meeting with the chief minister msr

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×