मुंबई : केंद्र सरकारने साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये देशातून १० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. साखर कारखाने, रिफायनरी आणि निर्यातदारांना साखर निर्यात करता येईल. ऑक्टोंबर २०२३ पासून साखर निर्यातीवर बंदी होती. त्यामुळे या निर्णयाचा देशभरातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातून साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. मागील तीन हंगामात साखर उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना तीन वर्षांत उत्पादन केलेल्या साखरेच्या ३.१७४ टक्के इतका साखर निर्यात कोटी मंजूर करण्यात आला आहे. दहा लाख टनांपैकी राज्यातील कारखान्यांना ३ लाख ७४ हजार ९९६ टन साखर निर्यात कोटा मंजूर झाला आहे. साखर कारखान्यांनी निर्यातीत गैरव्यवहार केल्यास, मंजूर कोट्यापैकी जास्त साखर निर्यात केल्यास केंद्र सरकारकडून कारखान्यांना प्रति महिना साखर निर्यात कोटा दिला जातो. त्यात घट करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. कारखान्यांनी दर महिन्याला किती साखर निर्यात झाली, या बाबतची माहिती एनडल्ब्यूएसडब्ल्यू संकेतस्थळावर भरावयाची आहे.

india is able to adapt to changing conditions of trade to remain strong in global market in future as well
जागतिक साखर बाजारपेठेत भारताची महत्वाची भूमिका, हर्षवर्धन पाटील कॉफको इंटरनॅशनल परिसंवाद
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
fruits export clusters
राज्यात फळ निर्यातीसाठी तीन क्लस्टर, जाणून घ्या, कोणत्या फळासाठी, कुठे होणार क्लस्टर
Adv Manik Kokate assures that he will be on farm embankment to solve problems of farmers
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बांधावर, नाशिक कृषी महोत्सवात ॲड. माणिक कोकाटे यांचे आश्वासन
Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
central government raised purchase price of ethanol from C heavy molasses to Rs 57 97 per liter from Rs 56 58
इथेनॉल खरेदीच्या दरवाढीचे गाजर जाणून घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयावर साखर उद्योग नाराज का
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती

हेही वाचा >>>एक रुपयात पीकविमा बंद? बोगस अर्ज, गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस

राज्यनिहाय साखर निर्यात कोटा (टन)

महाराष्ट्र – ३,७४,९९६, उत्तर प्रदेश – २ लाख ७४ हजार १८४, कर्नाटक – १ लाख ७४ हजार ९८०, तमिळनाडू – ३४,२३६, गुजरात – ३१,९९४, हरियाना – २२,२१०, मध्य प्रदेश – १८,४०४, बिहार – २०,२९७, पंजाब – १७,२००, उत्तराखंड – १३,२२३, तेलंगाणा – ७,८४२, आंध्र प्रदेश – ५,८४१, छत्तीसगड – ३,४२३, ओदिशा – ८८६, राजस्थान – २८४.

हेही वाचा >>>मुंबई : महापालिकेचे ५८६ कर्मचारी निवडणूक कामातच, ४६ जणांचे वेतन रोखले

उत्तरेकडील राज्यांचा कोटा महाराष्ट्राला ?

केंद्र सरकारने साखर निर्यात कोटा जाहीर करताना उत्तरेकडील राज्यांतील साखर कारखान्यांना निर्यात कोटा दिला आहे. पण, उत्तरेतील राज्यातून रस्ते वाहतूक करून साखर बंदरावर आणून निर्यात करणे वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होत नाही. साखर निर्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात किनाऱ्यावरील बंदरातून होते. त्यामुळे उत्तरेतील राज्याला वाहतूक खर्च जास्त लागतो. केंद्र सरकारने उत्तरेतील साखर कारखान्यांना कोटा देताना कोटा हस्तांतरीत करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार काही कमीशन घेऊन किंवा देशांतर्गत बाजारातील कोटा आपल्याला घेऊन निर्यात कोटा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील कारखान्यांना हस्तांतरीत करू शकतात. त्याचा फायदाही राज्यातील कारखान्यांना होण्याची शक्यता आहे.

निर्णयाचे स्वागत, पण, निर्यात कोटा कमी

केंद्र सरकारने दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. पण, हा साखर निर्यात कोटा अत्यंत कमी आहे. पण, केंद्र सरकारने जे दिले आहे, त्याचे स्वागत करतो. दरवर्षी साखर निर्यातीला परवानगी मिळावी. जेणेकरून जागतिक बाजारातील ग्राहक कायम राहील. आता २०१८ पासून स्थिर असलेल्या किमान साखर विक्री मूल्यात आणि इथेनॉलच्या दरात वाढ करावी, असे मत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

Story img Loader