मी तुरूंगातून सुटलोय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी काही दिवसांच्या पॅरोल रजेवर तुरूंगातून बाहेर आलोय, असेच मला वाटत असल्याची भावना संजय दत्तने व्यक्त केली. येरवडा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत तो बोलत होता. यावेळी संजय दत्तने आपला उल्लेख दहशतवादी म्हणून करू नये, अशी विनंतीही प्रसारमाध्यमांना केली. टाडा न्यायालयाने मला दहशतवादाच्या आरोपातून मुक्त केले असून मी शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत होतो, हे संजय दत्तने स्पष्ट केले.
दरम्यान, या पत्रकारपरिषदेत संजय दत्तने आजचा दिवस बघायला माझे वडिल हवे होते, अशी भावनाही व्यक्त केली. आगामी काळात मला माझ्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवायचा आहे आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचेही यावेळी संजय दत्तने सांगितले.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर