मुंबई : राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढत असून एप्रिलमध्ये तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे. तिन्ही मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. त्याचप्रमाणे मागील दाेन महिन्यात उष्माघाताचे १०१ रुग्ण सापडले आहेत. यामध्येही मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये रुग्णांच्या संख्यत दुपटीने वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये ७१ तर मार्चमध्ये ३० रुग्ण सापडले आहेत.
सातत्याने तापमानात वाढ होत असून राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पाोहचले आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना अतिसार, उलट्या, डोकेदुखी, निर्जलीकरण, त्वचाविकार यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याबरोबरच वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचाही नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. मागील दोन महिन्यांमध्ये राज्यामध्ये उष्माघाताचे १०१ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मार्चमध्ये ३० रुग्ण सापडले होते. तर एप्रिलमध्ये त्यात दुपटीने वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये उष्माघाताचे ७१ रुग्ण सापडले आहेत.
नागपूरमध्ये उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्चमध्ये नागपूरमधील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या तीन हाेती, एप्रिलमध्ये उष्माघाताचे १० रुग्ण सापडण्याबरोबरच तिघांचा संशयित मृत्यूची नोंद झाली आहे.
एप्रिलमध्ये यवतमाळमध्ये सर्वाधिक रुग्ण
राज्यात सर्वाधिक उष्माघाताच्या रुग्णांची नोंद यवतमाळमध्ये (१७) झाली आहे. मार्चमध्ये यवतमाळमध्येही एकाही रुग्णांची नोंद नव्हती. त्याखालोखाल एप्रिलमध्ये बुलढाणामध्ये ८ रुग्ण नागपूरमध्ये ७ रुग्णांची नाेंद झाली आहे.
दोन महिन्यातील उष्माघाताच्या रुग्णांची नोंद
यवतमाळ १७ रुग्ण, बुलढाणा १२ रुग्ण, नागपूर १० रुग्ण, जालना ८ रुग्ण, परभणी ६ रुग्ण, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये ५ रुग्ण, धुळे, पालघर, रायगडमध्ये प्रत्येकी ४ रुग्ण, लातूर, नांदेडमध्ये प्रत्येकी ३ रुग्ण, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, वर्धा, वाशिममध्ये प्रत्येकी २ रुग्ण, उस्मानाबाद, पुणे, सांगली, सातारा, ठाण्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. मुंबईमध्येही अद्यापपर्यंत एकाही रुग्णांची नोंद झाली नाही.
एप्रिलमध्ये ३०० पशू-पक्षी जखमी
वाढत्या तापमानाचा माणसांप्रमाणे प्राणी व पक्ष्यांनाही त्रास होत आहे. निर्जलीकरणामुळे अनेक पक्षी झाडावरून पडून जखमी होत आहेत. एप्रिलमध्ये जवळपास ३०० पशू-पक्षी जखमी झाले आहेत. यामध्ये घार, कबुतरे, कावळे, पोपट, बदक, कावळे, मांजर, कुत्रा, कासव यांचा समावेश आहे.
वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते ४ यावेळेत घरातून बाहेर पडू नये. तसेच घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी, गॉगल, पाण्याची बाटली बाळगावी.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.डॉ. कैलास बाविस्कर, सहसंचालक, आरोग्य सेवा विभाग
हे करा
- पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
- हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात – गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
- उन्हात जाताना टोपी किंवा हॅटमध्ये ओलसर कपडा ठेवा.
- पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.
- पंखा, कुलर आणि ओलसर पडदे यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करु नका
- शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
- कष्टाची कामे उन्हात करु नका.
- पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
- गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका.
- उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
- मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.
- शिळे अन्न आणि खूप प्रथिन युक्त अन्न खाऊ नका.