मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशात शिस्तबद्ध विकास साधला आहे. त्यामुळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशात चमकता तारा म्हणून लौकिक मिळत आहे. अवघे जग भारताचा आदर करते, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केले. याचबरोबर रब्बी हंगामाचा सुमारे तीन लाख टन कांदा शासन खरेदी करणार असून तशा सूचना ‘नाफेड’ या सरकारी संस्थेला देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जी-२०’च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप पार पडला. यानिमित्त गोयल उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना गोयल म्हणाले, ‘‘मागील नऊ वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पद्धतशीर विकास साधला असल्याचे उदाहरणादाखल सांगितले. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचे नाव उंचावले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा जागितक महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. म्हणून भारत हा विकसित अर्थव्यवस्था असलेले देश आणि विकसनशील अर्थव्यवस्था असलेले देश यांना जोडणारा आर्थिक सेतू म्हणूून पुढे येत आहे.’’

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India global economy union commerce minister piyush goyal ysh
First published on: 31-03-2023 at 00:46 IST