लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सण-उत्सव आणि सुट्टीच्या कालावधीत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असून प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. या रेल्वेगाड्यांसाठी विशेष तिकीट भाडे आकारण्यात येते. मात्र, जादा पैसे मोजूनही दुय्यम सेवा मिळत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. अलिकडेच एलटीटी-कानपूर अतिजलद एक्स्प्रेस तब्बल नऊ तास विलंबाने सुटल्याने, प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.

Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
Thane , non-agricultural tax , notices, Thane citizens,
सरकारने रद्द केलेल्या अकृषिक कराच्या ठाणेकरांना नोटीसा, नोटीसांमुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
Jasprit Bumrah Set to Miss Upcoming White-ball Series
बुमराची पाठीची दुखापत किती गंभीर? चॅम्पियन्स करंडक स्पर्धेला मुकण्याचा धोका?
Akola Railway gate, Railway gate closed, Akola ,
अकोला : आठ दिवस रेल्वे फाटक बंद, नागरिकांना मनस्ताप
pimpri chinchwad municipal corporation administrative regime
प्रशासकीय राजवटीत विकासकामांना खीळ, पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ९०० कोटी शिल्लक; नऊ महिन्यांत केवळ ३७ टक्के रक्कम खर्च
Tanker ban for three months Administration choice of alternative to prevent pollution thane news
पुन्हा तीन महिन्यांसाठी टँकर बंदी! प्रदूषण रोखण्यासाठी पुन्हा सोप्या पर्यायाची निवड

नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने अनेक प्रवासी अतिरिक्त पैसे मोजून विशेष रेल्वेगाडीचे तिकीट काढतात. त्यामुळे प्रवास वेळेत व्हावा अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, विशेष रेल्वेगाड्या विलंबाने रवाना होत असल्याने, प्रवाशांचे प्रवासाचे नियोजन बिघडते. त्यामुळे महिला, वृद्ध प्रवासी, रुग्ण आदींना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. गाडी क्रमांक ०४१५१ कानपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५५ वाजता येणे अपेक्षित होते. त्यानुसार शेकडो प्रवासी एक्स्प्रेस सुटण्याच्या वेळेच्या आधी आले होते. मात्र, तब्बल ९ तास विलंबाने ही रेल्वे एलटीटी स्थानकात पोहचली. ही एक्स्प्रेस रात्री १२.१० वाजता स्थानकात पोहचली. त्यानंतर रात्री २.३९ वाजता एलटीटी – कानपूर अतिजलद एक्स्प्रेस एलटीटीवरून सुटली. परिणामी, अनेक प्रवाशांना तब्बल १२ तासांहून अधिक काळ स्थानकात काढावा लागला.

आणखी वाचा-पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

गाडी क्रमांक ०४१५१ मुंबई विभागात ८ तासांपेक्षा जास्त उशिरा आली. त्यामुळे रेल्वेगाडीला नियोजित मार्ग आणि फलाट मिळाला नाही. एलटीटीवर रेल्वेगाडीसाठी जागा उपलब्ध नसल्याने बराच कालावधी रेल्वेगाडी थांबली. रेल्वेगाडी एलटीटी येथे रात्री १२.१० वाजता आली, असे मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाच्या एक्स खात्यावरून माहिती देण्यात आली.

Story img Loader