scorecardresearch

Premium

JNU आणि ‘टाटा इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थ्यांची दहशतवादी कारवायासाठी करण्यात आली भरती; NIA चा ठपका

भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र आणि देशातील दहशतवादी कारवायांसाठी भरती केले असल्याचे म्हटले आहे

Koregaon bhima case nia jnu tiss students recruited for terror

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या २२ सदस्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींनी कथितरीत्या भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आणि देशातील दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असा ठपका आरोपपत्रात ठेवला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित एल्गार परिषद प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये एनआयएने दिल्लीच्या जेएनयू तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) च्या विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असे म्हटले आहे.

गेल्या चार वर्षांपासून भारतीय राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणांच्या संदर्भात अटक केलेल्या १६ आरोपी आणि इतर सहा फरार व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेल्या दुहेरी खटल्यांमध्ये एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात हा दावा केला आहे.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
मुक्त विद्यापीठाला चार महिन्यात १६२ कोटीचा विक्रमी महसूल; अनेक नव्या अभ्यासक्रमांना मान्यता
student , Mahatma Jotiba Phule Research and Training Institute , financial aid scheme
‘आर्थिक साहाय्य योजने’कडे ‘महाज्योती’चे दुर्लक्ष; शेकडो विद्यार्थी लाभापासून वंचित
National level selection
ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर निवड, शर्विन कार्व्हालो विद्यार्थ्यास संशोधनासाठी पाठ्यवृत्ती
Agricultural University akola
अकोला : कृषी विद्यापीठात २० एकरावर साकारणार जिवंत पीक प्रात्यक्षिके; एकाच ठिकाणी २१० विविध पिकांच्या जाती, यंदा प्रथमच शिवार..

दोन्ही प्रकरणांच्या प्रदीर्घ तपासानंतर, एनआयएच्या विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी.ई. कोथळीकर यांच्यासमोर गेल्या आठवड्यात मसुदा आरोपपत्र दाखल करण्यात आले. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी दहशतवादी कारवायांसाठी दोन प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई) यासह विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नेमलं होतं असा ठपका ठेवला आहे.

यासाठी, आरोपींनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारविरोधात युद्ध करण्याचा कट रचला होता. नेपाळ आणि मणिपूरमधून एम -४ (अत्याधुनिक शस्त्र) च्या ४,००,००० फेऱ्या आणि इतर शस्त्रास्त्रांच्या वार्षिक पुरवठ्यासाठी ८ कोटी रुपयांची नियोजन करण्याचे षडयंत्र रचले असे एनआयएने म्हटले आहे.

या प्रकरणामध्ये सुधीर पी. ढवळे, वेरनोन गोन्साल्विस, अरुण टी. परेरा, रोना जे. विल्सन आणि गौतम नवलखा, सुरेंद्र पी. गडलिंग, शोमा के. सेन, महेश एस. राऊत, पी. वरवरा राव, सुधा भारद्वाज, आनंद बी. तेलतुंबडे, हनी बाबू एम. थरायल, सागर गोरखा, रमेश गायचोर यांना अटक करण्यात आली आहे. तर दिवंगत स्टॅन स्वामी यांचा ५ जुलै रोजी मुंबईतील कोठडीत मृत्यू झाला.

पुण्यातील शनिवारवाडयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवादी संघटनांचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांना अटक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून कागदपत्रे, लॅपटॉप, पत्रे जप्त करण्यात आली होती. बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांच्या प्रमुखांशी ते संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Koregaon bhima case nia jnu tiss students recruited for terror abn

First published on: 23-08-2021 at 17:09 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×