मुंबई : सीबीएसई-आयसीएसई  केंद्रीय शिक्षण मंडळांप्रमाणे अंतर्गत मूल्यांकन किंवा दोन सत्रांतील लेखी परीक्षेनुसार दहावी-बारावीचे निकाल जाहीर करण्याऐवजी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रचलित पद्धतीनुसारच लेखी परीक्षा घेऊनच निकाल जाहीर के ला जाणार आहे. दिवाळी सुट्टीनंतर लगेचच शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत घोषणा होणार असून परीक्षा, निकालांबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या मनात असलेला संभ्रम दूर केला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाचे अधिकारी, मुख्याध्यापक, मॉडरेटर, संस्थाचालक, शिक्षक आदी परीक्षांशी संबधित मंडळींशी नुकतीच चर्चा केली. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत संबंधितांनी एकमुखाने नेहमीच्या वार्षिक लेखी परीक्षेनुसारच दहावी-बारावीचे निकाल जाहीर करण्यात यावे, अशी सूचना केली. तसेच नवीन कोणताही परीक्षा पॅटर्न आणून विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण करण्याऐवजी ८०-२० यानुसारच निकाल जाहीर करण्यात यावा, असा विचार संबंधितांनी मांडला. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra board 10th 12th exams 2021 to be held offline zws
First published on: 28-10-2021 at 04:16 IST