मुंबई : मुंबई, पुणे, ठाण्यासह सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नंगरपंचायतींमधील नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली असून, राज्य शासनाच्या देखरेखेखाली नव्याने प्रभागांची रचना केली जाईल.

निवडणुकीचा सारी प्रक्रिया स्वत:कडे घेण्याचा कायदा सरकारने केला. या कायद्याला राज्यपालांची संमती मिळाल्याने सरकारने नवे अधिनियम जारी केले आहेत. यानुसार मुंबईसह सर्व महानगरपालिकांमध्ये झालेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. राजपत्रात तशी नोंद करण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यात प्रभाग रचनेचा मसुदा घोषित करून त्या आधारे हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी देण्यात आली. त्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे प्रभागांची अंतिम रचना मंजूरीसाठी सादर करण्यात आली होती. तेवढय़ात प्रभाग रचनेचे अधिकार सरकारने स्वत:कडे घेण्याचे विधेयक मंजूर झाले.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
High Court Takes Note of Petition Against Light Pollution from Tree Decorations in Mumbai sent notice to maharashtra government
झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदुषणासाठी कारणीभूत, उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह मुंबई पालिकेला नोटीस

प्रभागांची नव्याने करण्यात आलेली रचना रद्द करण्यात आल्यावर राज्य शासन प्रभागांची हद्द व त्यांची विभागणी करणार आहे. म्हणजेच राज्य निवडणूक आयोगाच्या देखरेखेखाली महानगरपालिकांनी केलेली प्रभागांची रचना पुन्हा नव्याने करावी लागेल. ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारने हे पाऊल उचलले आहे. काहीही करून या निवडणुका पावसाळय़ानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरला व्हाव्यात, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.