मुंबई : राज्यात यापूर्वी झालेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा आढावा घेणे व येऊ घातलेल्या गुंतवणुकीचा पाठपुरावा करणे, त्यांतील अडीअडचणी दूर करणे, सामंजस्य करारांची अंमलबजावणी करणे, यासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोवोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी झालेल्या गुंतवणुकीवरुन विरोधी पक्षांनी टीका केल्यानंतर राज्य सरकारने गुंतवणूक हा विषय गांभीर्याने हाताळण्याचे ठरविले आहे. त्यानुसार राज्यात झालेल्या व होऊ घातलेल्या गुंतवणूक विषयक सामंजस्य करारांचा व इतर प्रलंबित महत्त्वाच्या प्रश्नांवर संबंधित विभागातील अधिकारी यांच्यासमवेत विभागस्तरावर आढावा घेण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात आला आहे. त्यात विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी (विशेष प्रकल्प), उद्योग विभागाचे सहसचिव वा उपसचिव यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकारण, सिडको, नगरविकास, पर्यावरण, ऊर्जा, कामगार, महसूल व वन व इतर संबंधित विभागाचे अधिकारी हे निमंत्रत सदस्य असतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government form task force for implementation of investment agreements mumbai print news zws
First published on: 28-01-2023 at 05:53 IST