आता वेळ निघून गेली आहे. जर रस्त्यावर लढाऊ झाली तर तिथेही आम्हीच जिंकू अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान दिलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे असं आव्हान दिलं.

“फक्त कायदेशीर मार्ग नाही तर सर्व प्रकारचे मार्ग अवलंबणार आहोत. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही असं सांगतो. आम्ही सभागृहात जिंकू, जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे ते मुंबईत येऊ शकतात,” असं संजय राऊत म्हणाले.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

Maharashtra Political Crisis Live : भाजपाचं राज्यपालांना पत्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हस्तक्षेप करण्याची मागणी; वाचा प्रत्येक अपडेट…

“यांनी चुकीचं पाऊल उचललं आहे. त्यांना आम्ही परत येण्याची संधीदेखील दिली. पण आता वेळ निघून गेली आहे. आत्ताच आमची शरद पवारांसोबत चर्चा झाली. अनिल देसाई, दिलीप वळसे पाटीलदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

महाराष्ट्रावर राजकीय संकट आलं असताना आदित्य ठाकरे मध्यरात्री मातोश्रीबाहेर; कॅमेरे बंद करण्यास सांगितलं, नेमकं काय झालं?

“तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे. आता आमचं आव्हान आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “याच इमारतीमधून महायुतीची घोषणा झाली होती. येथूनच महायुतीचं बंधन बांधण्यात आलं. याच इमारतीमधून मी तुम्हाला महाविकास आघाडी मजबूत असून पुढील अडीच वर्ष पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल असं सांगतो”.

दिलीप वळसे पाटील यांना का बोलावण्यात आलं होतं? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. ते अनुभवी नेते असून विधानसभा अध्यक्षही राहिले आहेत. त्यांच्यात आणि अनिल देसाई यांच्यात कायदेशीर लढाईसंबंधी चर्चा झाली. जे आम्हाला करायचं आहे ते आम्ही केलं आहे”.

“शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वात मोठे नेते आहेत. मी त्यांना भिष्म पितामह म्हणतो. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेहमी चर्चा होत असते,” असं संजय राऊतांनी सांगितलं. तसंच अल्टिमेटमचा वेळ संपला असल्याचंही म्हटलं.