मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहर आणि उपनगरांमध्ये पार पडलेले भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण, जंगी मिरवणुकांसाठीचा २८ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला.

भारतीय निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी आचारसंहिता लागू केली. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्याआधी मुंबईतील महानगरपालिका तसेच एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी यंत्रणांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन, उद्घाटन थाटामाटात करण्यात आले. कार्यक्रमस्थळी उभारलेले भव्य मंडप, व्यासपीठ, आसनव्यवस्था, स्वच्छता, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांना त्याबाबत देण्यात आलेल्या जाहिराती, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन मार्गावर करण्यात आलेली रंगरंगोटी, मार्गावरोधक आदींचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून झाला आहे.

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO

हेही वाचा – परराज्यातून होणारी घुसखोरी रोखणार, मनसेच्या जाहीरनाम्यात आश्वासन

घाटकोपरमध्ये पार पडलेल्या जंगी मिरवणुकीची पूर्वतयारी आणि व्यवस्थेसाठी मुंबई पालिकेलाच निधी खर्च करावा लागला आहे. या मिरवणुकीच्या खर्चावरून वादही झाला होता, मात्र राजकीय दबावापोटी महापालिकेला खर्च करावा लागला होता.

टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेला मुंबई सागरी किनारा मार्ग, मुंबईमधील काही उड्डाणपुलांचे उद्घाटन, ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण यासह काही प्रकल्पांचे भूमिपूजन, इतर सोहळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उरकण्यात आले.

हेही वाचा – गुजरातधार्जिण्या धोरणांमुळे पाच लाख रोजगार बुडाले ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप

महापालिका प्रशासनाने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी प्रस्तावित केलेल्या निधीतून या कार्यक्रमांचा खर्च भागवावा लागला आहे. त्यापूर्वीच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पणासाठी महापालिकेने केवळ ३८ लाख रुपये खर्च केले होते. त्यातुलनेत २०२३-२४ या वर्षात महापालिकेला मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागला आहे.


सर्वाधिक खर्च ‘ए’ विभागात

कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सीएसएमटी परिसराचा समावेश असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत २०२३-२४ मध्ये आयोजित विविध कामांसाठी महापालिकेने सर्वाधिक म्हणजे चार कोटी ५० लाख रुपये खर्च केले आहेत. त्याखालोखाल दादर, माहीमचा समावेश असलेल्या जी-उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कार्यक्रमांसाठी महापालिकेचे तीन कोटी ७० लाख रुपये खर्च झाले आहेत. तसेच एच-पूर्व परिसरात तीन कोटी ३० लाख रुपये, के-पूर्व परिसरात दोन कोटी ५५ लाख रुपये, एफ-उत्तर परिसरात दोन कोटी, पी-दक्षिणमध्ये एक कोटी ८३ लाख रुपये, बी विभाग कार्यालयाच्या हद्दीत एक कोटी ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Story img Loader