मुंबई : नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शनिवारपासून (३० नोव्हेंबर) राज्यातील थंडी कमी होण्याचा अंदाज आहे. नाशिक, नगर, पुण्यात गुरुवारीही पारा ९ अंशांवर होता.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी (२८ नोव्हेंबर) स्थिर होते. या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून चक्रीवादळात रुपांतर होऊन, ते शनिवारी (३० नोव्हेंबर) तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील महाबलीपुरम् ते पुदुच्चेरीच्या किनारपट्टीवरील कराईकल दरम्यानच्या भागात धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पूर्व आणि आग्नेय दिशेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यातील थंडी काही दिवस कमी होणार आहे.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides
हवामान प्रकोपाचे गतवर्षांत देशात २४०० बळी, जाणून घ्या, उष्णतेच्या झळांची स्थिती काय
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
Pune Circular Road Financial tenders open for three phases Mumbai print news
पुणे वर्तुळाकार रस्ता: तीन टप्प्यासाठी आर्थिक निविदा खुल्या
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?

हेही वाचा : राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या ६५ टक्क्यांवर, जाणून घ्या, विभागनिहाय पेरण्यांची स्थिती

दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पारा गुरुवारीही नऊ अंशांवर कायम आहे. हवामान कोरडे असल्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. गुरुवारी नगरमध्ये ९.५, पुण्यात ९.८, नाशिकमध्ये १०.५, साताऱ्यात १२.५, सोलापुरात १४.६, औरंगाबादमध्ये ११.६, धाराशिवमध्ये १२.४, परभणीत ११.५, नागपुरात ११.८, गोंदियात ११.४, वर्ध्यात १२.४ आणि अकोल्यात १२.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : वैमानिक तरूणीचा मृत्यू : आत्महत्येपूर्वी आरोपी मित्राला व्हिडिओ कॉल

विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात रविवार (१ डिसेंबर) आणि सोमवारी (२ डिसेंबर) तुरळक ठिकाणी हलक्या ते अत्यंत हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही तुरळक ठिकाणी सोमवारी पावसाची शक्यता आहे.

Story img Loader