मुंबई : मुंबईतील टँकरमाफीयांच्या माध्यमातून पाणीपुरवठय़ात सुमारे १० हजार कोटींचा गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे आशीष शेलार यांनी मुंबईतील पाणी प्रश्नावर मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान सामंत बोलत होते. पाणी चोरी रोखण्यासाठी आणि पाणी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी  पालिकेमार्फत ११० किलोमीटर लांबीच्या  जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. ९६ हजार ४०० ठिकाणी गळती शोधून दुरुस्ती करण्यात आली असून सुमारे १० हजार अनधिकृत जलजोडण्या खंडित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात  समान पाणी वाटपाबाबतचा  समितीचा अहवाल महानगरपालिकेकडून तत्काळ मागवण्यात येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांसाठी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister uday samant announces inquiry into rs 10000 crore tanker water scam in mumbai zws
First published on: 25-03-2023 at 02:55 IST