scorecardresearch

Premium

मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती, भाई जगताप यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्याशी चर्चा…”

विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभव आणि मुंबईत महापालिका निवडणुकीत ‘एकला चलो रे’ ही भूमिका भाई जगताप यांना महागात पडल्याचं सांगितलं जातंय.

Varsha gaikwad bhai jagtap
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती झाल्यावर भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजपाप्रमाणे काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल सुरु झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( ९ जून ) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांच्या जागी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी ही घोषणा केली आहे. यावर आमदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

“याबद्दल माझ्याशी चर्चा करण्यात आली होती. आठवडाभर ही चर्चा सुरु असून, नेत्यांशी बोलूनच हा निर्णय झाला आहे. कृपाशंकर सिंह, संजय निरूपम, मिलिंद देवरा यांच्याशी चर्चा करूनच अन्य लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच, एकनाथ गायकवाड यांच्याशी बोलूनच माझीही नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मुंबई काँग्रेस एका महिलेला संधी देते, याचा मला आदर आणि अभिमान आहे,” असं भाई जगताप म्हणाले.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

हेही वाचा : “औरंगजेब याच मातीतला”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर, म्हणाले…

“वर्षा गायकवाड यांनी मंत्री म्हणून आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे. माझ्या नियुक्तीवेळीही वर्षा गायकवाड यांचं नाव चर्चेत होते. त्यामुळे हटवणं आणि ठेवणं हा प्रकार काँग्रेसमध्ये नसतो,” असं स्पष्टीकरण भाई जगताप यांनी दिलं.

विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर दलित चेहरा देण्यात यावा म्हणून वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नावर भाई जगताप यांनी सांगितलं की, “जाती धर्म बघून कधीही काँग्रेसने निर्णय घेतले नाहीत. या गोष्टीचा आणि विचारांचा मला अभिमान आहे.”

हेही वाचा : “क्षुल्लक कारणासाठी शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा…” खासदार श्रीकांत शिंदे असं का म्हणाले?

“देशातील मुली एका खासदाराच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तरीसुद्धा ५६ इंच वाले मोदी आणि त्यांचं सरकार डोळे झाकून बसले असून, त्यांना लाज वाटायला पाहिजे. मुंबईतील आणि सावित्रीबाई फुले वसतिगृहात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांची नियुक्ती अतिशय योग्य आहे,” असंही भाई जगताप यांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mla bhai jagtap react after varsha gaikwad mumbai congress president ssa

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×