शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा नाकारल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. संभाजीराजे काय भूमिका घेणार? याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यातच आज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ही राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच, यापुढे ‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून मावळ्यांना, गोरगरीब समाजघटकांना एकत्र करण्यासाठी मी मोकळा झालो आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली असून शिवसेनेवर टीका केली आहे.

संभाजीराजे काय म्हणाले?

“मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे”, असं ते म्हणाले.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शनकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात

शिवसेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंचा राज्यसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय; म्हणाले, “…आता मी मोकळा झालोय”!

घोडेबाजार टाळण्यासाठी घेतला निर्णय

राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. “ज्या आमदारांनी ड्राफ्टवर सह्या केल्या, त्या आमदाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी राहणार आहे. त्यांनी केव्हाही हाक द्यावी. शिवसेनेनं मला ऑफर दिली होती. पक्षात प्रवेश करा आणि खासदार व्हा. पण मी सांगितलं होतं की मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत की कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच. पण मला कल्पना आहे की यात नक्कीच घोडेबाजार होणार. घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण ते होताना दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे”, असं संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

संभाजीराजेंना शिवसेनेनं पाठिंबा नाकारण्याआधी नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत जाहीर केला घटनाक्रम!

मनसेकडून प्रतिक्रिया

संभाजीराजे यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणं वेदनादायक होतं. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत”, असं गजानन काळे म्हणाले आहेत.

अपक्ष निवडणूक लढवणार होते संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपासून भाजपा किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत अपक्ष म्हणून आपल्याला सर्व पक्षांनी पुढाकार घेऊन पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं होतं. मात्र, शिवसेनेनं आपलाच उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार म्हणून संभाजीराजेंनी निवडणूक लढवावी, अशी अट त्यांना घालण्यात आली होती. मात्र, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय अंतिम असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली.