एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि दुसरीकडे आता जलवाहतूक बंद झाल्यामुळे अलिबागमधील प्रवाशांची दुहेरी कोंडी झाल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. खाजगी वाहने आणि शेअर टॅक्सीचा वापर करून मुंबई आणि पनवेल गाठण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
   

अलिबागमधील एसटीच्या कामगार संघटनांनी आपली आडमूठी भुमिका अद्याप सोडलेली नाही. पगारवाढ मिळूनही अलिबाग आगारातील कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे नौदल सप्ताहामुळे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यान सुरु असणारी जलप्रवासी वाहतूक २ ते ४ डिसेंबर अशी तीन दिवस बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत जाणाऱ्या आणि अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची दुहेरी कोंडी झाली आहे.
  

mumbai best bus marathi news, mumbai long queues of passengers marathi news
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
Over 3500 monthly passes for air-conditioned locales on a single day
गारेगार प्रवासाला पसंती! वातानुकूलित लोकलचे एकाच दिवशी ३,५०० हून अधिक मासिक पास
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

मुंबई ते अलिबाग दरम्यान मांडवामार्गे जल प्रवासी वाहतूक केली जाते, यातून दररोज सुमारे साडेतीन हजार प्रवासी प्रवास करतात. शनिवार रविवार या दोन दिवसात या जलमार्गावरील प्रवाशांची संख्या आठ ते दहा हजारांपर्यंत पोहोचते, जलद आणि आरामदायी प्रवासासाठी या मार्गाला प्रवाशांची पसंती मिळत असते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात या जलवाहतुकीचा मोठा आधार अलिबागकरांना होता. मात्र नौदल सप्ताहामुळे जलवाहतूक प्रवासी सेवा बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठीच अडचण झाली आहे.