मुंबई : शहरात शुक्रवारी ६९६ नव्या रुग्णांचे निदान झाले असून ६५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ५९८ दिवसांवर गेला आहे, तर रुग्णवाढीचा दर ०.११ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. शुक्रवारी शहरात २६,२२८ चाचण्या झाल्या. शहरातील बाधितांचे प्रमाणही अवघ्या दोन टक्क्यांवर आले आहे.

ठाणे जिल्ह्यात ४१३ बाधित 

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४१३ करोना रुग्ण आढळून आले. तर ४२ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीत ११३, ठाणे ८७, नवी मुंबईत ७२, ठाणे ग्रामीण ६०, मिरा भाईंदर ४४, बदलापूर १२, अंबरनाथ १२, उल्हासनगर सात आणि भिवंडीत सहा करोना बाधित रुग्ण आढळून आले. तर अंबरनाथमध्ये २२, ठाणे ४, कल्याण-डोंबिवली ४, नवी मुंबई ३, मिरा-भाईंदर ३, ठाणे ग्रामीण ३, भिवंडी दोन आणि उल्हासनगरमधील एकाचा मृत्यू झाला.