scorecardresearch

मुंबईकरांची पाणी चिंता मिटली; मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९९.३३ टक्के पाणीसाठा

जूनमध्ये आटलेली पाण्याची पातळी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने मुंबईवर १० टक्के पाणीकपात लागू केली होती.

mumbai dam water storage lakes that supply drinking water to mumbai are 99 33 percent full
(संग्रहित छायचित्र)

मुंबई : सप्टेंबर महिन्यात पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांवर असलेली पाणीकपातीची समस्या आता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये शुक्रवारी पहाटे एकूण ९९.३३ इतक्या पाण्याची नोंद झाली. धरणामध्ये उपलब्ध असणारा पाणीसाठा वर्षभर पुरेल एवढा असल्यामुळे आता पाणीकपात करण्याची आवश्यकता नसल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> “मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्याची हिंमत….”, तृप्ती देवरुखकरांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल

special train on Mumbai to Nagpur route
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! या मार्गावर दोन दिवस धावणार विशेष गाडी
cleaning campaign at mumbai beach, mumbai municipal corporation, bmc cleaning campaign at sea area
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग; महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता मोहीम
ganesh visarjan
मुंबई : मुख्य विसर्जनस्थळांना विम्याच्या कवचाची गरज
state government released information of water levels in maharashtra dams
पाणीकपातीचे संकट तूर्तास दूर; मुंबईच्या सात धरणांत ९७ टक्के जलसाठा

मुंबई शहर व उपनगरांना ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणीसाठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे. यंदा पावसाचा लपंडाव पाहता मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाद्वारे ऑक्टोबर महिन्यात पाणीकपात करण्याची शक्यता वर्तविली होती. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार होती. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सातही धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीकपातीचा निर्णय जाहीर करण्यात येणार होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची तहान भागणार असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा >>> मुंबईः दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला १२ तासांत अटक; मुलाची सुखरूप सुटका

जूनमध्ये आटलेली पाण्याची पातळी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने मुंबईवर १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, जुलैमध्ये दिलासादायक पाऊस पडल्याने पालिका प्रशासनाने ८ ऑगस्ट रोजी पाणीकपात मागे घेतली होती. तसेच,जुलै महिन्यात तुळशी, विहार, तानसा आणि मोडकसागर हे चार तलाव ओसंडून वाहू लागले होते. मात्र, ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने पुन्हा पाणीकपातीची चिंता वाढली होती. सद्यस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये १४ लाख ३७ हजार ११५ दशलक्ष इतका पाणीसाठा जमा झाला आहे. उपलब्ध पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा १४ लाख २२ हजार ०९२ इतका होता. तसेच सध्या ऊर्ध्व वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धरणांमध्ये उपलब्ध असणारा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

२९ सप्टेंबर २०२३ – १४ लाख ३७ हजार ७१५

२९ सप्टेंबर २०२२ – १४ लाख २२ हजार ०९२

२९ सप्टेंबर २०२१ – १४ लाख ३२ हजार ३२८

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai dam water storage lakes that supply drinking water to mumbai are 99 33 percent full mumbai print news zws

First published on: 29-09-2023 at 21:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×