मुंबई : फेंगल चक्रीवादळाचा मुंबईवरील प्रभाव शनिवारी संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवस असह्य उकाडा सहन करावा लागल्यानंतर रविवारी पहाटे गारवा निर्माण होऊन मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन तीन दिवसात किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात रविवारी १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान शनिवारच्या तुलनेत ३ अंशांनी कमी होते. तर कुलाबा येथे २०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंदले गेले. हे तापमान शनिवारच्या तुलनेत ३ अंशांनी कमी होते. पुढील दोन तीन दिवसात मुंबईच्या किमान तापमानात आणखी घट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

unseasonal rain, Vidarbha, temperature, rain ,
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता! किमान तापमानात वाढ
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides
हवामान प्रकोपाचे गतवर्षांत देशात २४०० बळी, जाणून घ्या, उष्णतेच्या झळांची स्थिती काय
अग्रलेख : ‘मौसम’ है आशिकाना…
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
Mumbai temperature, drop in temperature,
मुंबई : तापमानात घट होण्याची शक्यता

हेही वाचा – हृदय शस्त्रक्रियेद्वारे तीन जणांना जीवदान! पश्चिम भारतातील दुर्मिळ शस्त्रक्रिया…

सोमवारपासून अनेक भागात किमान तापमान २० अंशाखाली असण्याची शक्यता आहे. तर काही भागात १५ अंश सेल्सिअस देखील राहील. कमाल तापमानाचा पारा मात्र या कालावधीत ३० ते ३२ अंशादरम्यान राहील. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी ३०.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा – Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर मुंबईतून १ हजार ९६३ बॅनर्स, झेंडे काढले, ‘या’ वॉर्डात सर्वाधिक बॅनर्स

मुंबईबरोबरच राज्यातही किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. विविध भागात वाऱ्याच्या दिशेत बदल होतील. याचा थंडीच्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. किमान तापमानात हळूहळू घट होईल त्यामुळे थंडीचे प्रमाण सौम्य राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Story img Loader