scorecardresearch

Premium

मुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय?

पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेश काढले आहेत.

mumbai-police
मुंबई कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय?

मुंबईत सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांनी काढले आहेत. मुंबईतील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे ५ पेक्षा अधिक लोकांना बेकादेशीरित्या एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे निर्देश काढले आहे. याबाबत त्यांनी एक पत्र जारी केलं आहे. त्यानुसार २८ मे पासून ११ जूनपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी राहतील. शहरातील जनजीवन विस्कळीत करण्याचा, दंगल घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक जणांना बेकायदेशीरित्या एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असं पत्रात सांगितलं आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

यातून लग्नकार्ये, अंत्यसंस्कार, चित्रपटगृहे, नाटक, शाळा, महाविद्यालये, दुकाने, कारखाने आणि विभागीय पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेल्या संमेलनाला आणि मिरवणुकीला सूट देण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai police prohibits people form groups till june 11 ssa

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×